महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Monday 25 December 2017

नवोपक्रम जाणूया

नवोपक्रमासाठी नमूना विषय

📑📒👫📝👥👥📝👫📒📑
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       
                     नवोपक्रम विशेष
            ➖➖➖➖➖➖➖
            शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
                        महाराष्ट्र शासन
                       यांनी आखलेला
         “प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम”
                ——————————
या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाला यशस्वी करण्याची धूरा ज्या विभिन्न घटकांवर अवलंबून आहे, त्यातील महत्वपूर्ण घटक म्हणजे आम्ही “शिक्षक”.  शिक्षकाला नवचैतन्य देणारी बाब म्हणजे सभोवताली झटणारे उपक्रमशिल शिक्षक, आणि या उपक्रमशिल शिक्षकांचे नविन प्रयोग व कार्यशैली चा आत्मा म्हणजे ” नवोपक्रम ”
                        —————
🔻नवोपक्रमासाठी नमूना विषय 🔻
➖➖➖➖➖➖➖➖
१. पेपरलेस प्रशासन
२. प्रोजेक्ट ई लर्निंग
३. बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे
४.   दिवस नवा, भाषा नवी
५. पर्याप्त साधनांतून स्वंयप्रेरणेतून शब्द व वाक्य निर्मिती
६.  माझी कविता / विद्यार्थी काव्य संग्रह
७.  सू्र्यमालेचे अभिनव निरीक्षण
८.  बोलीभाषेतून शब्दकोश निर्मिती
९. गणित विषयातील संबोध संकल्पना रुजवणूक
१०. एक तास राष्ट्रासाठी
११.  भाषिक प्रयोगशाला
१२ .  पर्यावरण संरक्षक दल
१३. सौरऊर्जा जागरुकता व वापर
१४.  विषय खोली
१५. आम्ही स्वच्छता दूत
१६.  तंबाकूमूक्त शाळा
१७.  प्लास्टिक मुक्त शाळा
१८.  विज्ञान भवन
१९.  मैत्री संख्यांची
२०.  आदर्श परिपाठातून नैतिक मूल्य संवर्धन
२१.  एक दिवस गावासाठी
२२.  विषय कोपरा – प्रभावी माध्यम
२३.  विशेष विद्यार्थी कोपरा
२४.  पुस्तक भिशी
२५.  शालेय व वैयक्तिक स्वच्छता संकल्प
२६.  क्रीडा दूत
२७.  राष्ट्रीय महापुरुषांची यशोगाथा
२८.  हरित शाळा
२९.  प्रदूषण हटवा अभियान
३०.  चालता बोलता
३१. माझा मित्र परिवार
३२. माझे पूर्व ज्ञान
३३. शब्दगंगा
३४.  कौन बनेगा ज्ञानपती
३५. वर्ड पॉट
३६. हस्ताक्षर सुधार मोहिम
३७.  संख्यावरील क्रिया – एक छंद
३८.  प्रश्नमंजूषा
३९.  विविध स्पर्धांतून व्यक्तिमत्व विकास
४०.  बालआनंद मेळावे
४१.  सातत्य पूर्ण उपस्थिती
४२.  पुस्तक जत्रा
४३.  फन एंड लर्न
४४.  शंकापेटी
४५. स्वयंपूर्ण विद्यार्थी शोध
४६.  रोपवाटिका निर्मिती
४७. एक तास इंटरनेट
४८.  गांडूळ खत निर्मिती
४९.  Student of the day
५०.  एक तास मुक्त अभ्यास
५१. समस्या व सूचना पेटी
५२. किशोरवयीन मुलींचे शिक्षण
५३.  लोकसंख्या शिक्षण
५४.  स्वच्छ शाळा, सुंदर गाव
५५.  वाचाल तर वाचाल
५६.  बिखरे मोती
५७.  Book of the day
५८.  विशेष व्यक्तींच्या मुलाखती
५९.  बालसभा
६०.  माझ्या गावचा इतिहास
६१.  परिसरातील भूरुपांची ओळख
६२.  विविध शिबीरांतून विद्यार्थी विकास
६३.  प्रयोगातून विज्ञान
६४.  मुक्त वाचनालय
६५.  खरा मित्र उपक्रम
६६.  गृहपाठ गट
६७.  टाकाऊतून टिकाऊकडे
६८.  हस्तलिखित निर्मिती
६९.  मुक्त अभिव्यक्तितून भाषा विकास
७०.  वर्तमानपत्रातून वाचन व लेखन समृद्धि
७१. व्यक्तिमत्व विकास व संवर्धन
७२. परिसर भेटीतून विज्ञान परिचय
७३.  चला शिकूया लघू़द्योग
७४.  दैनंदिनी लेखन
७५.  नविन अक्षर, शब्द, वाक्य बॅंक
७६. विविध स्पर्धा परीक्षा परिचय व तयारी
७७. शालेय परसबाग
७८.  संभाषण, वाचन, लेखन विशेष झोन
७९.  खेळातून गणित शिकू
८०. परिसरातील झाडांची ओळख, उपयोग व संवर्धन
८१. स्व कल्पनेतून शोध निबंध लेखन
८२. सांकेतिक भाषेचे खेळ
८३. दप्तराविना शाळा, विद्यार्थी
८४. लेखक, कवि, विशेष व्यक्तींच्या भेटीतून विद्यार्थी विकास
८५.  परिसरातील कलांची ओळख
८६.  गृहोपयोगी कुटीरोद्योगांची ओळख
८७.  गावातील सांस्कृतिक प्रतिकांचा शोध व संवर्धन
८८.  शैक्षणिक सहलीतून विद्यार्थी विकास
८९.  काव्यनिर्मिती, रचना व गायन
९०.  पाणी व्यवस्थापन
९१. बलिराजा चेतना अभियान
९२.  जलसाक्षरता
९३.  तंत्रस्नेही विद्यार्थी
९४.  कथा निर्मिती / चित्र कथा निर्मिती
९५.  रेन वॉटर हार्वेस्टिंग
९६ . पुस्तक परिचय व भेट
९७.  विशेष गरजा असणा-या मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळाभ्यास
९८ . निर्मल शाळा अभियान
९९.  विविध दिन साजरे करणे   

Wednesday 20 December 2017

त्रिमितीय डायमंड

त्रिमितीय डायमंड कसा करावा?
व्हिडीओ पाहण्यासाठी त्रिमितीय डायमंड clik करावा

Tuesday 5 December 2017

महत्वाचे दिनविशेष

महत्वाचे दिनविशेष...
============
सर्वांना पाठवा....

0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
———————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
———————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल==भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
—————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
—————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन ,                                  05 Octomber -valmiki mahshree jayanti.
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर==डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

🇮🚨Mission MPSC🚨
[02/12 1:15 pm] Prashant Bhakare: 🖌अभ्यास कसा करावा

कोणतेही काम प्रभावी रितीने करण्यासाठी मनाच्या एकाग्रेची गरज असते. एखादा लोहार, सुतार, केशकर्तनकार किंवा सोनार मनाची एकाग्रता सहजपणे अंगी बाणवितो. कारण एकाग्रतेच्या अभावी त्यांच्या कामामध्ये अपघात होउन नुकसान होण्याची शक्यता असते. मनाची एकाग्रता साधण्यासाठी हे कारागीर लोक कोणतीही पुस्तके वाचत नाहीत वा कोणत्या योगशिबीरातही जात नाहीत. सरावाने आपोआपच त्यांना ही एकाग्रता साधत असते. अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे, आणि ते प्रभावी रितीने पार पाडण्यासाठी "मनाच्या एकाग्रतेची" गरज विद्यार्थ्याला निश्चितच आहे. मनाची एकाग्रता नसेल तर साध्या साध्या कामांमध्येही चुका होउ शकतात, आणि एकाग्र मनाने अतिशय जोखमीची अवघड कामेदेखील अचूक होउन जातात.
मनाच्या एकाग्रतेमध्ये येणारे अडथळे कोणते? मनाची चंचलता ही सर्वात मोठी अडचण आहे. मन मोठे बलवान असते, चंचल असते. मनाला काबूत ठेवणे वा-याला पकडण्याएवढे अवघड असते. अखंड अभ्यास आणि अनासक्ती (वैराग्य) यांच्या सामर्थ्यानेच मनाला ताब्यात ठेवता येते असे भगवंतांनी गीतेमध्ये सांगीतलेले आहे. मनाची एकाग्रता साधणे हे सहजसोपे नाही तसे अशक्यही नाही. आयुष्यात कोणत्याही गोष्टीत असाधारण यश प्राप्त करुन घ्यायचे असेल तर मनाच्या एकाग्रतेला पर्यायदेखील नाही. मनाची एकाग्रता साधण्यासाठी, ज्यासाठी ही एकाग्रता साधायची त्या ध्येयाप्रती आपली अविचल श्रध्दा पाहिजे. ती गोष्ट प्राप्त करुन घेण्याची अपरिहार्यता मनाने स्विकारली पाहिजे. इतर अनेक पुरक गोष्टी एकाग्रता साधायला मदत करतील.
स्वामी विवेकानंद म्हणतात की एकाग्र मन हे एखाद्या सर्चलाईटप्रमाणे आहे. सर्चलाईटमुळे आपल्याला दूरवरची कानाकोप-यातली वस्तूदेखील स्पष्ट दिसते.
योगी जन आपल्या मनावर ताबा मिळवून अखंड परिश्रमाने मनाचे संतुलन प्राप्त करुन घेतात आणि असे संतुलीत मन एकाग्र करुन परमसत्याची प्राप्ती करुन घेतात. आपले सध्याचे ध्येय त्याहून बरेच सोपे आहे. आपल्याला आपले मन अभ्यासावर कसे केंद्रित करता येईल ते शिकायचे आहे.

👉१. अभ्यासाला बसताना योग्य आसन असणे गरजेचे आहे. टेबल खुर्ची किंवा डेस्कसारखी उंच वस्तू घ्यावी. पाठीचा कणा ताठ राहील अशी बसण्याची स्थिती असावी. पुरेसा उजेड असावा, लिहिताना आपल्या हाताची सावली लेखनावर पडणार नाही अशी प्रकाशाची दिशा असावी. रोज एकाच ठिकाणी अभ्यासाला बसण्याची सवय ठेवावी. स्वतंत्र खोली असल्यास उत्तम, अथवा, विशिष्ट कोपरा निवडावा. एकाच ठिकाणी रोज अभ्यासाला बसल्याने त्या ठिकाणी गेल्यानंतर मन आपोआप अभ्यासासाठी तयार होते. मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते कारण त्या ठिकाणी ईश्वराचे वास्तव्य आहे अशी आपल्या मनाची धारणा असते, तसेच हे आहे.

👉२. एकदा अभ्यासाला बसले की शरीर शक्यतोवर स्थिर ठेवावे, चुळबुळ करु नये. पेन किंवा पेन्सील चावणे, केस खाजविणे, विनाकारण इकडेतिकडे बघणे, वेडेवाकडे बसणे अशा गोष्टी टाळाव्यात. हे एकाग्रतेच्या दृष्टीने प्रतिकुल व हानीकारक समजावे. सतत हलणा-या भांड्यातील पाणी जसे हिंदकळत राहते, त्याप्रमाणे अशा गोष्टींमुळे मनदेखील अस्वस्थच राहते. स्थिर व गंभीरपणे एका जागी बसणे खूप महत्वाचे आहे.

👉३. एखाद्या विषयाचा अभ्यास सुरु केला की किमान तासभर तरी त्या विषयाला द्यायला हवा. याचे कारण असे की मन त्या अभ्यासघटकाशी समरसव्हायलाच दहा मिनिटे लागतात. मनाची प्रवाही अवस्था त्यानंतर सुरु होउन आपण त्या विषयाच्या अंतरंगात प्रवेश करतो. त्या घटकांत दडलेला खरा अर्थ आपल्या अंत:चक्षुंसमोर उघड व्हायला लागतो. याआधी शिकलेले संबंधित घटक आठवायला लागतात, त्यांचे या घटकाशी असलेले सांधे मेंदूत जुळायला लागतात, व हळूहळू त्या घटकावर प्रभुत्व मिळायला लागते. ही प्रभुत्वाची भावना मग अभ्यासाची प्रेरणाही बनते.

👉४. अभ्यासाला बसल्यानंतर लगेच मनात ना ना त-हेचे विचार येणे सहाजिक आहे. मन अभ्यासासाठी तयार नसते. तरीही दहा मिनिटे चिकाटीने अभ्यास करीत रहावे. मन हळूहळू शांत होत जाईल व अभ्यासघटकाच्या अंतरंगात जायला लागेल. त्याचप्रमाणे अभ्यास एकदम थांबवूही नये, त्यानेही अभ्यासाचे नुकसान होते. आपण चालण्याचा व्यायाम करताना जसे सुरुवातीला व शेवटी हळूहळू चालतो व मध्यावर वेग जास्तीत जास्त ठेवतो तसेच हे आहे. वॉर्म अप व काम डाउन केल्याने मधल्या अवस्थेतील कामाचा पुरेपुर फायदा आपल्याला मिळतो.

👉५. अभ्यासाला बसण्याआधी घरच्यांना तशी कल्पना देउन "तासभर तरी मला बोलावू नका" असे सांगून ठेवावे. मोबाईलसारखे अडथळेही दूर ठेवावेत. कारण अशा अडथळ्यांमुळे मनाची एकाग्रता भंगते व ती पुन्हा प्राप्त करायला कष्ट पडतात. मनाची साधलेली प्रवाही अवस्था आपण गमावून बसतो. आणि पुढच्या वेळी ती अवस्था तेवढ्या प्रभावीपणे साधतही नाही.

👉६. अभ्यासाच्या ठिकाणी शांतता असणे अतिशय गरजेचे आहे. मनाला विचलीत न करणारे संगीत एकाग्रता वाढायला मदत करते. अर्थात इच्छा तीव्र असेल तर गोंधळातदेखील एकाग्रता साधता येते. इंद्रियांवरचे असे नि

यंत्रण अभ्यासाने साधता येते. शक्यतो शांतता मिळविण्याचा प्रयत्न करावा. आपल्या नियंत्रणाबाहेरच्या कारणामुळे अशांतता निर्माण होत असेल तर त्या अशांततेतही एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करीत रहावे. क्षुब्ध होउ नयेकिंवा निरर्थक वादविवादात वेळही घालवू नये.

👉७. अभ्यास करताना अवधान राखणे खूप गरजेचे आहे. मन चंचल असते, उगीच कुठेतरी भटकत राहते किंवा दिवास्वप्नांमध्ये मग्न होते. त्याला आवर घालून पुन्हा अभ्यासाला लावणे म्हणजे अवधान राखणे.
मनाला जागे ठेवण्याचे काही उपाय खाली सांगीतले आहेत :
💠अ. अतिशय गोड, अतिशय मसालेदार किंवा अतिस्निग्ध पदार्थ आहारात टाळावेत. अशा पदार्थांमुळे ग्लानी येते.
💠आ. शरीराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. कपडे स्वच्छ, नेटके व सैलसर असावेत. नखे कापलेली असावीत. दुर्गंधी, खाज, आग होणे यामुळे एकाग्रता साधण्यात अडचणी येतात. झोपायचा बिछाना व पांघरुण देखील स्वच्छ असणे आवश्यक आहे, त्यामुळे झोप शांत मिळून मन प्रसन्न राहिल.
💠इ. अभ्यासाची खोली, अभ्यासाची साधने (वह्या, पुस्तके, लेखनसाधने तसेच आपले हस्ताक्षरही) व्यवस्थित व नीटनेटकी असावीत. पुस्तके फाटली असल्यास ती व्यवस्थित शिवून घ्यावीत. पुस्तकांचा कप्पा, अभ्यासाचे टेबल व्यवस्थित आवरलेले असावे.
💠ई. घाणेरड्या व अश्लील विचारांना प्रयत्नाने मनाबाहेर करावे. मन गलीच्छ विषयांनी व्यापलेले असेल तर एकाग्रता कधीही साध्य होणार नाही. शुध्द, निष्पाप मनामध्येच एकाग्रतेची शक्ती सहज येते. म्हणून पापी व दुष्ट विचारांना दूर ठेवावे.
💠उ. लहान लहान ध्येये ठरवून ती साध्य करावीत. म्हणजे आत्मविश्वासात भर पडून एकाग्रता वाढत जाईल.

👉८. चकाट्या पिटण्याची सवय पूर्णत: सोडावी. ज्या विषयाशी आपल्याला काहीही घेणेदेणे नाही, ज्या विषयाशी संबंधित कोणतीही कृती आपण करणार नाही त्या विषयाबद्दल बडबड करुन आपल्या तोंडाची वाफ दवडू नये. अशा निरर्थक बडबडीमुळे मनाची घडी व शिस्त बिघडते. मन दुबळे व गैरशिस्त हात जाते.

👉९. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केल्यावर डोके दुखत असेल तर तो शरीराचा दोष आहे हे ओळखून, योग्य व्यायाम, आहार व वैद्यकिय उपचार यांनी तो दूर करावा. च्यवनप्राश, ब्राह्मी सारखी औषधे, दूधासारखा पौष्टिक आहार यांचाही उपयोग होउ शकतो.

👉१०. मनाच्या एकाग्रतेसाठी सर्वोत्तम पुरक साधन म्हणजे श्रध्दा. श्रध्देच्या सहाय्याने ध्येयाचा मार्ग सहज आक्रमिता येतो व त्यायोगे ध्येय प्राप्त करता येते. श्रध्देच्या जोरावरच शिवरायांच्या मावळ्यांनी शून्यातून स्वराज्य उभारले. औरंगजेबाची अफाट सामर्थ्यशाली सेना युद्ध हारली ती देखील श्रध्देच्या अभावामुळेच. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ज्ञानसंपादनाची अफाट शक्ती सुप्तावस्थेत दडून असते. आपल्या अंतस्थ शक्तीबाबत आपण साशंक राहू नये. जीवनात अपयशी ठरणारी माणसे अपयशी ठरतात ती स्वत:ची शक्ती न ओळखल्यामुळे. "काळजीपूर्वक अभ्यास करुन मी माझ्या ज्ञानाचा विकास करुन घेईनच" अशा निर्धाराने अभ्यासाला लागलात तर अशक्य काहीच नाही.

👉११. शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम. आपल्या आवडीच्या ठिकाणी वास करणे मनाला नेहमी आवडते. अर्थात तुम्ही जर तुमच्या अभ्यासविषयांवर प्रेम कराल तर एकाग्रतेने अभ्यास करणे तुम्हाला सहज जमेल. परिचय, सहवासानेच प्रेम वाढते. म्हणून अभ्यासाचे विषय तुम्हाला लगेच आवडू लागतील असे नव्हे. पण अभ्यासाचा विषय जसा कळू लागेल, आकलन वाढू लागेल तशी अभ्यासाची गोडी आपोआप वाढेल. श्रध्दा आणि प्रेम यांद्वारे साधली जाणारी मनाची एकाग्रता ताणरहित व संघर्षरहित असते.
[02/12 1:15 pm] Prashant Bhakare: MPSCmaths:
🔹आपली मापन माहिती.

🎾 1 इंच  = 2.54 सेमी
🎾  1 फूट = 12 इंच ,30 सेमी
🎾 1मीटर  =100 सेमी, 3.10 सेमी
🎾 1 कि. मी. = 1000 मीटर
🎾 1 मैल  =  1.6 किलोमीटर

🏓1 गुंठा = 100 चौ. मी
🏓 1एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी.
🏓1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर
🏓1 हेक्टर = 10000 चौ. मी.

🍇1 डझन = 12 वस्तू / नग
🍇12 डझन = 1 ग्रोस.
🍇 1  दस्ता = 24 कागद.
🍇20 दस्ता  = 1रीम, 480 कागद
🍇1तोळा =  10 ग्रॅम.

⏱1तास = 60 मिनिटे
⏱1मिनिट = 60 सेकंद
⏱1 तास  = 3600 सेकंद
⏱1दिवस =24तास, 86400सेकंद
⏱1 दिवस =24 तास =1440 मि.

🔹Trick

           💻१  ते  १०० संख्यांच्या बेरजा

 (१)१ ते १० पर्यंत संख्यांची बेरीज -
      १+२+३+४+५+६+७+८+९+१०=५५

(२)११ ते २०पर्यंत संख्यांची बेरीज -
     ११+१२+१३+१४+१५+१६+१७+
     १८+१९+२० = १५५

(३) २१ ते ३० पर्यंत संख्यांची बेरीज -
      २१+२२+२३+२४+२५+२६+२७+
      २८+२९+३० = २५५

(४) ३१ ते ४० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ३१+३२+३३+३४+३५+३६+३७+
      ३८+३९+४० = ३५५

(५) ४१ ते ५० पर्यंत संख्यांची बेरीज -
     ४१+४२+४३+४४+४५+४६+४७+
     ४८+४९+५० = ४५५

(६) ५१ ते ६० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ५१+५२+५३+५४+५५+५६+५७+
      ५८+५९+६० = ५५५

(७) ६१ ते ७० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ६१+६२+६३+६४+६५+६६+६७+
      ६८+६९+७० = ६५५

(८) ७१ ते ८० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ७१+७२+७३+७४+७५+७६+७७+
      ७८+७९+८० = ७५५

(९) ८१ ते ९० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ८१+८२+८३+८४+८५+८६+८७+
      ८८+८९+९० = ८५५

(१०) ९१ ते १०० पर्यंत संख्यांची बेरीज -
        ९१+९२+९३+९४+९५+९६+९७+
        ९८+९९+१०० = ९५५
    *************************************

          १ ते १० संख्यांची बेरीज =  ५५
        ११ ते २० संख्यांची बेरीज = १५५
        २१ ते ३० संख्यांची बेरीज = २५५
        ३१ ते ४० संख्यांची बेरीज = ३५५
        ४१ ते ५० संख्यांची बेरीज = ४५५
        ५१ ते ६० संख्यांची बेरीज = ५५५
        ६१ ते ७० संख्यांची बेरीज = ६५५
        ७१ ते ८० संख्यांची बेरीज = ७५५
        ८१ ते ९० संख्यांची बेरीज = ८५५
      ९१ ते १०० संख्यांची बेरीज =९५५
        १ ते १०० संख्यांची बेरीज = ५०५०
[02/12 1:15 pm] Prashant Bhakare: महाराष्ट्रातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇
महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?
👉 १ मे १९६०
महाराष्ट्राची राजधानी कोणती?
👉 मुंबई
महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव?
👉 नागपूर
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग?
👉 ६
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग?
👉 ५
महाराष्ट्रातील एकुण जिल्हे?
👉 ३६
महाराष्ट्रातील महानगरपालिका?
👉 २६
महाराष्ट्रातील नगरपालिका?
👉 २२२
महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत?
👉 ७
महाराष्ट्रातील  जिल्हापरीषदा?
👉 ३४
महाराष्ट्रातील एकुण तालुके?
👉 ३५८
महाराष्ट्रातील पंचायत समित्या?
👉 ३५५
महाराष्ट्राची लोकसंख्या किती?
👉 ११,२३,७४,३३३
स्त्री : पुरुष प्रमाण किती?
👉 ९२९ : १०००
महाराष्ट्रातील एकुण साक्षरता?
👉 ८२.९१%
महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग
सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा?
👉 मुंबई उपनगर (८९.९१% )
सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा?
👉 नंदुरबार (६४.४% )
सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा?
👉 रत्नागिरी
सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा?
👉 मुंबई शहर
क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 अहमदनगर
क्षेत्रफळाने लहान जिल्हा?
👉 मुंबई शहर
जास्त लोकसंख्येचा जिल्हा?
👉 ठाणे
कमी लोकसंख्येचा जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग
भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण?
👉 ९३%
महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते?
👉 आंबा
महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?
👉 मोठा बोंडारा
महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?
👉 हारावत
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
👉 शेकरु
महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती?
👉 मराठी
महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर?
👉 कळसुबाई (१६४६ मी.)
महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी?
👉 गोदावरी
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
भारतातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇
सर्वांत जास्त उष्ण ठिकाण?
👉 गंगानगर ( राजस्थान )
सर्वांत जास्त जिल्ह्यांचे राज्य?
👉 उत्तरप्रदेश
सर्वाधिक लोकसंख्येचे शहर?
👉 मुंबई (१,८४,१४,२८८ )
सर्वाधिक साक्षर असलेले राज्य?
👉 केरळ
सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 गिरसप्पा धबधबा
सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद
सर्वांत लांब नदी कोणती?
👉 ब्रह्यमपुत्रा
सर्वांत मोठी घुमट कोणती?
👉 गोल घुमट
सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 थरचे वाळवंट
सर्वांत उंच पुतळा कोणता?
👉 गोमटेश्वर ( बाहुबली )
सर्वांत मोठे धरण कोणते?
👉 भाक्रा नांगल
सर्वांत उंच धरण कोणते?
👉 टिहरी
सर्वांत लांब धरण कोणते?
👉 हिराकुड
सर्वांत लांब बोगदा कोणता?
👉 जवाहर बोगदा
सर्वांत मोठे स्टेडियम कोणते?
👉 युवा भारती
सर्वांत उंच मनोरा कोणता?
👉 दुरदर्शन मनोरा
सर्वांत उंच झाड कोणते?
👉 देवदार
क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 कच्छ
लोकसंख्येने मोठा जिल्हा?
👉 ठाणे
सर्वाधिक पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
जगाचे जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇
सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 सहारा ( आफ्रिका )
सर्वांत मोठे बेट कोणते?
👉 ग्रीनॅलंड
सर्वाधिक लोकसंख्येचा देश?
👉 चीन
क्षेत्रफळाने मोठा देश कोणता?
👉 रशिया
सर्वांत मोठा खंड कोणता?
👉 आशिया
सर्वांत मोठी गर्ता कोणती?
👉 मरियना
सर्वांत मोठा पक्षी कोणता?
👉 शहाम्रुग
सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश?
👉 सुंदरबन
सर्वांत मोठा पुतळा कोणता?
👉 स्टॅचु ऑफ लिबर्टी
सर्वांत मोठी नदी कोणती?
👉 अॅमेझॉन
सर्वांत मोठे बंदर कोणते?
👉 सिडनी
सर्वांत मोठा महासागर कोणता?
👉 पॅसिफिक महासागर
सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद ( दिल्ली )
सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 व्हेनेझुएला
सर्वांत लहान खंड कोणता?
👉 ऑस्ट्रेलिया
सर्वांत लहान महासागर कोणता?
👉 आर्क्टिक महासागर
सर्वांत लहान पक्षी कोणता?
👉 हमिंग बर्ड
सर्वांत लहान दिवस कोणता?
👉 २२ डिसेंबर
सर्वांत लांब नदी कोणती?
👉 नाईल
सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम ( मेघालय )
सर्वांत जलद उडणारा पक्षी?
👉 हमिंग बर्ड
सर्वांत लांब सामुद्रधुनी कोणती?
👉 मलाक्काची सामुद्रधुनी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फक्त स्वत : चेच नॉलेज वाढवु नका, दुसरयाचे सुद्धा नॉलेज वाढवा. धन्यवाद.
👏👏👏👏👏👏👏👏
जर वाटले की याला खुप नॉलेज आहे, तर जास्तीत जास्त ग्रुपवर पुढे पाठवा. धन्यवाद .
🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
[02/12 1:15 pm] Prashant Bhakare: विविध अहवालात भारताचा क्रमांक:-
------------------------------------------------------------------------

१) उद्योग विकासf  निर्देशांक (जीआरडीआय):-
* जागतिक किरकोळ उद्योग विकास निर्देशांकामध्ये (जीआरडीआय) भारताने 30 विकसनशील देशांच्या यादीत 13 क्रमांकांनी झेप घेत सध्या दुसरे स्थान पटकावले
प्रथम:- चीन
दुसरा:- भारत
तिसरा:- रशिया

२) जागतिक शांतता निर्देशांक:-
पहीला:- आइसलँड
दुसरा:- डेन्मार्क
तिसरा:- ऑस्ट्रिया
१४१ वा:- भारत(२०१५ मध्ये भारताचा क्रमांक १४३ वा होता)

अशांत देश:-
पहिला:- सीरिया
दुसरा:- दक्षिण सुदान,
तिसरा:- इराक

३) जागतिक सामाजिक प्रगती निर्देशांक:-
प्रथम:-नार्वे
दुसरा:- स्वीडन
तिसरा:- स्वीत्झर्लंड
१०१ वा:- भारत

४) वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट :-
( २०१३च्या तुलनेत सहा अंकांनी घसरण)
प्रथम:- स्वीत्झर्लंड
दुसरा:- आइसलंड
११७वा:- भारत

५) काळा पैसा देशाबाहेर जाणार्या यादीत:-
प्रथम:- चीन
दुसरा :- रशिया
३ रा:- मलेशिया
४था:- भारत

६)  सयुंक्त राष्ट्र मानव विकास अहवाल -
प्रथम:- नार्वे
२ रा :- ऑस्ट्रेलिया
३ रा:- स्वीत्झर्लंड
१३० वा:- भारत((मागील वर्षी या यादीत भारताचा १३५ वा क्रमांक होता )

 ७) व्यवसाय सुलभतेमध्ये ( Doing Business ):-
जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या या अहवालानुसार १८९ देशाच्या यादीत भारताचा १३० क्रमांक गतवर्षीच्या तुलनेत भारताने १२ स्थानाची प्रगती
प्रथम:- सिंगापूर
२ रा :- न्युझीलंड
३ रा:- डेन्मार्क
१३० वा:- भारत

८) ब्रॅड फायनान्स या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मुल्यांकानुसार भारताला जगातील सातव्या क्रमांकाचा ब्रॅड म्हणून घोषित करण्यात आले
प्रथम:- अमेरिका
२ रा:- चीन
३ रा:- जर्मनी

९)) भ्रष्टाचार निर्देशांक :-
ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या २०१५ मधील अहवालानुसार भारताचा ७६ वा क्रमांक आहे (गतवेळी भारत ८५ व्या क्रमांकावर होता
पहिले ३ देश
पहिला :- डेन्मार्क
२ रा :-फिनलंड
३ रा:- स्वीडन
शेवटचे ३ देश
सोमालिया
उत्तर कोरिया
अफगाणिस्तान
(ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय बिगर शासकीय संस्था असून मे १९९३ मध्ये जर्मनीमध्ये या संस्थेची स्थापना झाली.विविध देशामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचे मोजमाप करण्याचे काम ही संस्था करते)

१०) उर्जा सुरक्षा निर्देशांक:-
प्रथम:- स्वीत्झर्लंड
दुसरा:- नार्वे
तिसरा:-स्वीडन
९० वा:- भारत

MPSC-
[02/12 1:15 pm] Prashant Bhakare: ★|| मराठी व्याकरण ||★📕📕अग्निपंख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अंबाजोगाई.

📚 चला ग्रंथकार ओळखू या📚

•▪•▪•▪•▪•▪•▪•▪•

१) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

o   विश्वास पाटील
o   आनंद यादव
o   रणजीत देसाई
o   शिवाजी सावंत ✅

२) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   यशवंत कानेटकर
o   वि. स. खांडेकर ✅
o   व्यंकटेश माडगुळकर
o   आण्णाभाऊ साठे

३) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?

o   आण्णाभाऊ साठे ✅
o   बा. भ. बोरकर
o   गौरी देशपांडे
o   व्यंकटेश माडगुळकर

४) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?

o   लक्ष्मीकांत तांबोळी
o   प्रा. व. भा. बोधे
o   विश्वास महिपाती पाटील ✅
o   वा. म. जोशी

५) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?

o   गावचा टिनोपाल गुरुजी ✅
o   चंद्रमुखी
o   ग्रंथकाली
o   मंजुघोषा

६) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .

o   नामदेव ढसाळ ✅
o   दया पवार
o   जोगेंद्र कवाडे
o   आरती प्रभू

७) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   झाडाझडती
o   संभाजी
o   बनगरवाडी ✅
o   सात सक त्रेचाळीस

८) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   श्री. ना, पेंडसे
o   भालचंद्र नेमाडे ✅
o   रा. रं. बोराडे
o   ग.ल. ठोकळ

९) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?

o   मुक्तामाला
o   बळीबा पाटील
o   यमुना पर्यटन ✅
o   मोचनगड

१०) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   एकेक पान गळावया ✅
o   स्फोट
o   कल्याणी
o   झाड

११) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?

o   गौरी देशपांडे
o   शैला बेल्ले
o   जोत्स्ना देवधर
o   सुमती क्षेत्रमाडे ✅

१२) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ?

o   डॉ. यशवंत पाटणे ✅
o   आशा कर्दळे
o   ह.ना.आपटे
o   व.ह. पिटके

१३) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?

o   वामन परत आला
o   जगबुडी
o   एक होता फेंगाड्या
o   गावपांढर ✅

१४) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   राजेंद्र मलोसे ✅
o   भाऊ पाध्ये
o   दादासाहेब मोरे
o   जयंत नारळीकर

१५) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   कल्पनेच्या तीरावर ✅
o   गारंबीचा बापू
o   पांढरे ढग
o   वस्ती वाढते आहे
---------------------------------------------------

केंद्रीय पीक संशोधन केंद्र.   :=

===========================
१)केंद्रीय ऊस संशोधन केंद्र.
       =लखनौ (उत्तरप्रदेश)
२)केंद्रीय गहू संशोधन केंद्र.
       =कर्नाल (हरियाणा)
३)केंद्रीय आवळा संशोधन केंद्र
       =फैजाबाद (उत्तरप्रदेश)
४)केंद्रीय नारळ संशोधन केंद
       =कासरगोड (केरळ)
५)केंद्रीय केळी संशोधन केंद्
      =कळांडूथोराई (तामिळनाडू)
६)केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र
      =सांगोला, सोलापूर
७)केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र
      =मांजरी (पुणे)
८)केंद्रीय दूध संशोधन केंद्र
      =कर्नाल (हरियाणा)
९)केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र
      =सिमला
१०)केंद्रीय संत्री संशोधन केंद्र
      =नागपूर
११)केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र
      =अंबिकानगर (गुजरात)
१२)केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र
      =झाशी (मध्‍यप्रदेश)
१३)केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र
      =पुणे
१४)केंद्रीय काजू संशोधन केंद्र
      =पहूर
१५)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
      =बराकपूर (पश्चिम बंगाल)
१६)केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र
      =राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)
१७)केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र
      =नागपूर
१८)केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र
      =इंदोर (मध्‍यप्रदेश)
१९)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र
      =नागपूर
२०)केंद्रीय ज्‍वारी संशोधन केंद्र
      =राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)
२१)केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र
      =सोलन
२२)केंद्रीय उंट संशोधन केंद्र
      =जोरबीट (राजस्‍थान)
२३)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
      =बराकपूर (पश्चिम बंगाल)
२४)केंद्रीय लाख संशोधन केंद्र
      =रांची (झारखंड)
२५)केंद्रीय फळ संशोधन केंद्र
      =गणेशखिंड (पुणे)
२६)मसाला पीक संशोधन केंद्र
     =केरळ
२७)इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमीअॅरिड ट्रॉपिक्‍स
     =हैदराबाद (आंध्रप्रदेश)

• महाराष्ट्र --- लावणी, कोळी नृत्य

• तामिळनाडू --- भरतनाट्यम

• केरळ --- कथकली

• आंध्र प्रदेश --- कुचीपुडी, कोल्लतम

• पंजाब --- भांगडा, गिद्धा

• गुजरात --- गरबा, रास

• ओरिसा --- ओडिसी

• जम्मू आणी काश्मीर --- रौफ

• आसाम --- बिहू, जुमर नाच

• उत्तरखंड --- गर्वाली

• मध्य प्रदेश --- कर्मा, चार्कुला

• मेघालय --- लाहो

• कर्नाटका --- यक्षगान, हत्तारी

• मिझोरम --- खान्तुंम

• गोवा --- मंडो

• मणिपूर --- मणिपुरी

• अरुणाचल प्रदेश --- बार्दो छम

• झारखंड- कर्मा

• छत्तीसगढ --- पावन

• राजस्थान --- घूमर

• पश्चिम बंगाल --- गंभीरा

• उत्तर प्रदेश --- कथक
[02/12 1:15 pm] Prashant Bhakare: 👉• चालू घडामोडी प्रश्नउत्तरे •👈
_______________________
Join : t.me/policebhartiesprdha
_______________________
1. राज्य सरकारने पर्यावरण रक्षणासाठी -------- रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
👉 उत्तर : 16 नोव्हेंबर

2. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-44 खालीलपैकी कोणता आहे?
👉 उत्तर : श्रीनगर-कन्याकुमारी

3. सध्या महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री कोण आहेत?
👉 उत्तर : रामदास कदम

4. विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन कोणत्या जिल्ह्यात होणार आहे?👉 उत्तर : नंदुरबार

5. चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले?
👉 उत्तर : अंदमान-निकोबार

6. राज्य सरकार आणि ----- महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने व्हर्जिन हायपरलूप वन या कंपनीशी करार केला.
👉 उत्तर : पुणे

7. स्त्री-पुरुष तुलना या ग्रंथाचे लिखाण कोणी केले?
👉 उत्तर : ताराबाई शिंदे

8. देशात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन ------- रोजी साजरा केला जातो.
👉 उत्तर : 17 नोव्हेंबर

9. सन 1932 मध्ये कॉंग्रेसने बहिष्कार घातलेल्या ------- गोलमेज परुषदेची सुरुवात झाली.
👉 उत्तर : तिसर्‍या

10. ------ ही औध्योगिक क्षेत्रात वित्तपुरवठा करणार्‍या बँकामधील शिखर बँक होय.
👉 उत्तर : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया
_______________________
Join : t.me/policebhartiesprdha
_______________________
कॉपी लिंक सोबतच करा.....
_/\______/\_________/\_____/\___

⭐️👉 • चालू घडामोडी • 👈⭐️
___________________________
Join : t.me/policebhartiesprdha
___________________________

* ----------- या खाजगी बकेला कुवेत आणी सिंगापूर या देशामध्ये कार्यालये उघडण्याची परवानगी RBI ने दिली :- फेडरल बँक

* ३१ आक्टोंबर २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या UNESCO रचनात्मक शहरांच्या यादीत भारतातील ---------- या शहरांचा समावेश करण्यात आला आहे : --------?

* २०१७ चा २० वा भारतीय आंतराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव ---- या शहरात आयोजित करण्यात आला :- हैद्राबाद

* ---------- या देशाने २०२५ सालापर्यंत लॅटीन  लिपीत देशांचे नामांतर करण्याची योजना आखली :- ---------------?

* दुसरा राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोग --------- यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला :-------?

*------------- या फलंदाजाने  प्रथम श्रेणीत सर्वात जास्त द्वीशतक ठोकण्याचा पराक्रम केला :- चेतेश्वर पुजारा (१२)

* २० नोव्हेंबर २०१७ रोजी साजरा झालेल्या जागतिक बालदिनाचे संकल्पना ------- ही होती:-----------
___________________________
Join : t.me/policebhartiesprdha
___________________________

चालू घडामोडी प्रश्नसंच : २० नोव्हेंबर २०१७
_______________________________
Join : t.me/policebhartiesprdha
________________________________

प्र. 1) भारताच्या मनुश्री छिलरने मिस वर्ल्ड २०१७ हा किताब जिंकला. हा किताब जिंकणारी ती कितवी भारतीय ठरली आहे?
a) पहिली
b) तिसरी
c) पाचवी
d) सहावी

प्र. 2) South Asia Regional Training and Technical Assistance Center (SARTTAC) च्या सुकाणू समितीची अंतरिम बैठक नुकतीच कोणत्या शहरामध्ये पार पडली?
a) मुंबई
b) हैद्राबाद
c) नवी दिल्ली
d) बंगळुरु

प्र. 3) योग्य विधाने ओळखा:
a) मुडीज्‌ संस्थेने भारताच्या स्थानिक आणि परदेशी चलनदाता मानांकनात बीएए 3 वरुन बीएए 2 अशी सुधारणा केली
b) मानांकनाबाबतचा दृष्टीकोन सकारात्मकवरुन  स्थिर असा बदलला.
c) 13 वर्षांनंतर भारताच्या मानांकनात सुधारणा करण्यात आली आहे.
योग्य पर्याय निवडा:
1) फक्त a बरोबर
2) फक्त a व b बरोबर
3) फक्त a व c बरोबर
4) a, b, c सर्व बरोबर

प्र. 4) चुकीचे विधान ओळखा:-
a) चीनमधील शांघाय या शहरात शांघाय सहकार्य संघटनेची बैठकी 15-17 नोव्हेंबर दरम्यान पार पडली.
b) जून 2017 मध्ये भारत सदस्य बनल्यानंतर शांघाय सहकार्य संघटनेने आयोजित केलेली ही पहिलीच मंत्रीस्तरीय परिषद आहे.
पर्याय
1) फक्त a
2) फक्त b
3) a व b दोन्ही
4) यापैकी नाही

प्र. 5) जागतिक शौचालय दिन कधी साजरा केला जातो?
1) 16 नोव्हेंबर
2) 17 नोव्हेंबर
3) 18 नोव्हेंबर
4) 19 नोव्हेंबर

प्र. 6) यंदाचा इंदिरा गांधी शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
1) मनमोहन सिंह
2) सीएनआर राव
3) मीरा कुमार
4) यापैकी नाही

प्र. 7) महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कोणते राज्य 'महिला सुरक्षा दल' स्थापन करणार आहे?
1) पंजाब
2) महाराष्ट्र
3) दिल्ली
4) हरयाणा

प्र. 8) कोणत्या रोगावरील उपचारासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोफत दैनिक औषधी पद्धती सुरू केली आहे?
1) कॅन्सर
2) टीबी
3) विषमज्वर
4) हृदयरोग

प्र. 9) फॉर्च्यून या व्यवसाय मासिकाने नुकतेच जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार कोणता देश जगातील सर्वांत श्रीमंत देश ठरला आहे?
1) सिंगापुर
2) मलेशिया
3) दुबई
4) कतार

प्र. 10) खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या आरबीएल बँकेने कोणत्या शहरात नुकतीच सर्व महिला कर्मचारी असलेली शाखा उघडली आहे?
1) नवी दिल्ली
2) मुंबई
3) कलकत्ता
4) चेन्नई

                 👉 • उत्तरे • 👈
1) सहावी 2) नवी दिल्ली 3) a, b, c सर्व बरोबर  4) फक्त a (ही बैठक रशियामध्ये पार पडली) 5) 19 नोव्हेंबर  6) मनमोहन सिंग 7) दिल्ली 8) टीबी  9) कतार 10) चेन्नई
___________________________
Join : t.me/policebhartiesprdha
___________________________
[02/12 1:15 pm] Prashant Bhakare: * जनरल नॉलेज *
*भारतातील पहिली रेल्वे लाइन?Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)*
*भारतातील पहिले तारायंत्र?Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*
*भारतातील पहिली सूत गिरणी?Answer- मुंबई (१८५४)*
*भारतातील पहिले स्वातंत्र्य युद्ध?Answer- इ.स. १८५७*
*भारतातील पहिले जलविद्युत यंत्र?Answer- दार्जिलिंग (१८९७-९८)*
*भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र?Answer- मुंबई (१९२७)*
*भारतातील पहिला बोलपट?Answer- आलमआरा (१९३१)*
*भारतातील पहिली पंचवार्षिक योजना?Answer- १९५१*
*भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?Answer- १९५२*
*भारतातील पहिली परमाणु चाचणी?Answer- पोखरण, राजस्थान*
*भारतातील पहिले क्षेपणास्त्र?Answer- (पृथ्वी १९८८)*
*भारतातील पहिला उपग्रह?Answer- आर्यभट्ट (१९७५)*
*भारतातील पहिली अणुभट्टी?Answer- अप्सरा तुर्भे मुंबई* *(१९५६)*
*भारतातील पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?Answer- दिग्बोई (१९०१)*
*भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना?Answer- दुल्टी (१८८७)*
*भारतातील सर्वप्रथम घटना
*पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)*
*पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*
*पहिले पोस्टाचे तिकीट* *१*
*ऑक्टोबर १८५४*
*पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)*
*पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७*
*पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)*
*पहिला आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)*
*पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)*
*पहिली पंचवार्षिक योजना- १९५१*
*पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२*
*पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान*
*पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)*
*पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)*
*भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)*
*पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)*
*पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)*
*भारतातील पहिले
*भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज*
*पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे*
*पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन*
*राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी*
*पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद*
*पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू*
*पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
*पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)*
*स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा*
*पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर*
*भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)*
*इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय*
*सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)*
*सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम*
*सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.*
*भारतातील सर्वात उंचशिखरकोणते ?Answer- कांचनगंगा*
*भारतातील सर्वात उंचपुतळाकोणते ?Answer- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद)*
*भारतातील सर्वात उंचमिनारकोणते ?Answer- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट*
*सर्वात उंचवृक्षकोणते ?Answer- देवदार*
*भारतातील सर्वात मोठेसरोवर?Answer वुलर सरोवर (काश्मीर)*
*भारतातील सर्वात मोठा जिल्हा?Answer- लडाख (जम्मू- काश्मीर)*
*भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा?Answer- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)*
*भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)?Ans
wer- राजस्थान*
*भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य?Answer- उत्तर प्रदेश*
*भारतातील सर्वात मोठे धरण?Answer- भाक्रा (७४० फूट)*
*भारतातील सर्वात मोठा धबधबा?Answer- गिरसप्पा (कर्नाटक)*
*भारतातील सर्वात मोठे वाळवंट?Answer- थर (राजस्थान)*
*भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म?Answer- खरगपूर (प. बंगाल)*
*भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण?Answer- प्रगती मैदान (दिल्ली)*
*भारतातील सर्वात मोठी मस्जिद?Answer- जामा मशीद*
*भारतातील सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य?Answer- मध्य प्रदेश*
*भारतातील सर्वात उंच दरवाजा?Answer- बुलंद दरवाजा*
*भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा?Answer- सुवर्ण मंदिर (अमृतसर)*
*भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?*
*Answer- मावसिनराम (मेघालयं)🌹🌹रा.उ.पसलवाड  सर🌹🌹

डॉ बाबासाहेब आंबेडकर


डॉ.बाबासाहेब आंबेडकर
🔷जन्म : एप्रिल १४, इ.स. १८९१
🔷महापरिनिर्वाण : डिसेंबर ६, इ.स. १९५६
🔷जन्मस्थान: महू, मध्य प्रदेश
🔷पत्‍नी: रमाई भीमराव आंबेडकर आणि डॉ. सविता आंबेडकर ऊर्फ माई (माहेरच्या शारदा कबीर)
🔷अपत्ये: यशवंत भीमराव आंबेडकर
🔷आई: भिमाई रामजी आंबेडकर
🔷वडील: रामजी मालोजी आंबेडकर

💐   काही अभिमानाच्या गोष्टी   💐

देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, कायदा, शैक्षणिक, संस्कृतिक, विद्युत, जल, कृषी, स्त्रीउद्धार, कामगार, शेतकरी, औद्योगिकीकरण, दलितोद्धार अशा अनेक क्षेत्रात अतुलनिय योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताचे जनक असेही संबोधिले जाते. इ.स. २०१२ मध्ये झालेल्या सर्वात महान भारतीय (The Greatest Indian) या भारताच्या आंतराराष्ट्रीय सर्वेक्षणात स्वातंत्र्यानंतर सर्वात महान भारतीय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी घोषित झालेले आहेत. कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या शिर्ष १०० विद्वानांची यादी तयार तयार केली त्यात त्यांनी प्रथम स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठेवून त्यांना जगातला नंबर १ महाविद्वान म्हणून त्यांचा गौरव केला. इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाने गेल्या १० हजार वर्षांमधील जगातल्या सर्वांत प्रभावशाली १०० विश्वमानवांची यादी प्रकाशित केली, त्यात चौथ्या स्थानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर प्रथम स्थानावर बुद्धांचे नाव होते. प्रचंड कुशाग्र बुद्धीमत्ता, प्रगाढ विद्वता, तल्लख स्मरणशक्ती असलेले बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानक्षेत्रातील तब्बल ६४ विषयांवर प्रभुत्व (मास्टरी) होते, एवढ्या साऱ्या विषयांवर प्रभुत्व असणारे जगाच्या इतिहासातील ते प्रथम व एकमेव व्यक्ती आहेत, असे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापिठाने संशोधनातून सिद्ध केले असून या विद्यापिठाने त्यांना जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून घोषित केले आहे.भारतीय बौद्धांसाठी डॉ. आंबेडकर हे महान बोधिसत्व आहेत, ही बौद्ध धर्मातील सर्वोच्छ उपाधी त्यांना नेपाळमध्ये इ.स. १९५४ मध्ये संपन्न झालेल्या जागतिक बौद्ध धर्म परिषदेसाठी आलेल्या बौद्ध भिक्खुंनी प्रदान केली होती. त्यानंतर इ.स. १९५५ मध्ये दलाई लामा बाबासाहेबांना भेटले तेव्हा लामांनी त्यांना बोधिसत्व संबोधले होते. जातिव्यवस्थेविरूद्ध प्रखर संघर्ष, महान भारतीय संविधान निर्माण अशा अनेक अतुलनीय देशसेवेसाठी दिलेल्या योगदानामुळे इ.स. १९९० साली भारत सरकारने त्यांना भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील कोट्यवधी शोषित, पीडित, क्रांतीकारी व मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान झालेले आहेत. बाबासाहेबांचा जन्मदिवस भीम जयंती किंवा आंबेडकर जयंतीसुद्धा जगातल्या ६५ पेक्षा अधिक देशांत दरवर्षी साजरी केली जाते.

🔜 संपूर्ण माहिती pdf मध्ये डाऊनलोड करा 🔙

🔜 महापरिनिर्वाण दिनाचे मराठी, इंग्रजी सूत्रसंचालन डाउनलोड करा 🔙

सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणार्‍या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. नंतर कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळवलेल्या आहेत.

🍁हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते.
🍁भारतीयांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.
🍁सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते.
🍁कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळाल्या.

🔷सुरुवातीचे जीवन

🍀मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. सुभेदार रामजी हे मालोजीरावांचे पुत्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ’नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. शिक्षण घेऊन ते सुशिक्षित, संस्कारसंपन्न व ज्ञानी होऊ शकले. मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला आणि शुद्ध आचाराला मोठे स्थान होते.

🍀डॉ. आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली महू या मध्यप्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या गावात त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार कुटुंबात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४वे अपत्य होते. हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचे. त्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते. त्यांच्या वडिलांना मराठी व इंग्रजी भाषांमध्ये थोडे शिक्षण मिळाले होते व त्यांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली.

🍀इ.स. १८९६ मध्ये भीमरावांच्या आईचे-भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यावेळी मातृविहीन भीमरावांचा ममतायुक्त आधार बनण्याचे मोठे काम आत्या मीराबाईंनी केले. त्या वयाने भाऊ रामजीपेक्षा मोठ्या आणि स्वभावाने प्रेमळ व समजूतदार होत्या. म्हणून रामजींसह सर्वजण त्यांचा आदर करीत असत.

🍀रामजींनी इ.स. १८९८ साली कुटुंब मुंबईला नेले. तेथे आंबेडकर एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले.

🍀 इ.स. १९०७ साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पार केली व इ.स. १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. हा प्रसंग त्यांच्या समाजातील लोकांनी अभिमानाने साजरा केला.

🍀इ.स. १९०६ मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय ९ वर्षे) यांच्याबरोबर ठरल

🍀अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी २५ रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली.

🍀इ.स. १९१२ साली त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांमध्ये पदवी मिळवली व बडोदा संस्थानाच्या सरकारात नोकरीची तयारी केली. याच वर्षी त्यांचा मुलगा यशवंत याचा जन्म झाला.

🍀कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू धर्मातील साहित्याची ओळख करून दिली. इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी आंबेडकरांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे.


🎓शिक्षण

📚पदवी-
एम.., पीएच. डी,. डी.एस्‌सी, एल्‌एल.डी., बॅरिस्टर अॅट लॉ.


📚प्राथमिक शिक्षण

भीमराव वयाने लहान असल्यामुळे ’कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षरओळख आपोआप होऊ लागली. इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली. ते सातारा येथे सुरुवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला सातारा येथील ’कॅम्प स्कूल’ मध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. भीमरावाचे नाव दाखल केले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला.

🎓उच्च शिक्षण
📚बी.ए.
डॉ. बाबासाहेब तथा बी.आर.आंबेडकर यांनी मुंबई येथील एलफिन्स्टन कॉलेजमध्ये बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले. नोव्हेंबर १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची परीक्षा दिली. जानेवारी १९१३मध्ये ते बी.ए.च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.
अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करण्याचा मान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवला.
बडोदा संस्थानचे स्कॉलर म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर परदेशी उच्चशिक्षणासाठी प्रथमतः अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील जगप्रसिद्ध कोलंबिया युनिव्हर्सिटीत गेले.

📚एम.ए.
एम.ए.या पदवीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी गेले होते.
अर्थशास्त्र, राजकारण, मानववंशशास्त्र, नीतिशास्त्र, व्यापार, समाजशास्त्र या विषयांवर प्रभुत्व मिळवायचे होते.या विषयांचा सखोल अभ्यास करून कोलंबिया विद्यापीठला दि. १५ मे १९१५ रोजी अॅडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर केला. दि. २/६/१९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना एम.ए.ची पदवी मिळाली.

✴आंदोलने

🌀चवदार तळे सत्याग्रह
इ.स. १९२६ साली आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला.

🌀काळाराम मंदिर सत्याग्रह
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक मुक्कामी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची घोषणा केली.
२ मार्च १९३० ही सत्याग्रहाची तारीख निश्चित झाली.
रामकुंडात उडी घेऊन सत्याग्रह यशस्वी करण्याची जबाबदारी शंकरराव गायकवाडावर सोपवण्यात आली.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ अशी जोरदार घोषणा देत पाण्यात उडी घेतली. पोलिसांनी त्यांना कुंडाबाहेर काढून बेदम मारहाण केली. आंबेडकरी चळवळीतील तरुणाने रामकुंडात उडी घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ब्रिटिश जिल्हाधिकारी गार्डन रामकुंडावर आले. सत्याग्रहींचा जोश व दृढ निश्चय पाहून त्यांनी रामकुंड व राममंदिर जनतेसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले.

✏पुणे करार (संक्षिप्त मसुदा)
 यातही तडजोड करण्यात आली व सह्या करण्यात आल्या. अस्पृश्य वर्गाच्या वतीने बाबासाहेबानी मुख्य सही केली तर सवर्णांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली.
इतर सर्व सभासदांनीही सह्या केल्या.  नथुराम गोडसे सारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदूसमाजाला अगदी उमजू नये ह्यांचे अत्रे यांना दु:ख होते. 'पुणे करारा'वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी 'पुणे करारा' वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कॉग्रेसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही. आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेतर अस्पृश्यांना हाती धरून कांग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकांत पराभव केला

🔷शैक्षणिक विचार
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.

🔷हिंदू कोड बिल
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे 'हिंदू कोड बिल' जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भाग्य हिंदुसमाजाचे! आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करून घेतला.

🔷भारताच्या स्वातंत्र्याबद्दलचे विचार
स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे.

🔷भारतीय घटनेचे शिल्पकार
भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेला इंग्रज सरकारकडून प्रयत्‍न करण्यात आले.
१९४६ ला माउंटबॅटनच्या नेतृत्वात एक आयोग भारतात आले. हा आयोग संविधान सभेच्या निर्मितीसाठी शेवटचा आयोग ठरला. या सर्व इतिहासात बाबासाहेबांचे मोठे योगदान राहिले आहे. संविधान निर्मितीच्या पूर्वेतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, अन्य कुणापेक्षाही जास्त आहे.
 बाबासाहेबांनी संविधानाच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदावरून केलेली कामगिरी आणि त्यांची संविधान सभेतील सर्व कलमांवर केलेली भाषणे म्हणजे या देशाचे भवितव्यच होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार ठरविण्याचा बहुमान आम जनतेने बहाल केला आहे.

🌀धर्मांतर
बाबासाहेबांना अखेर बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण, सदाचार, समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा वाटला म्हणून त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला.त्या दिवशी अशोकविजयादशमी होती(या दिवशी सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता).हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. महास्थविर चंद्रमणी यांचेकडूनत्रिशरण व पंचशील ग्रहण करून त्यांनी धम्मदीक्षा घेतली.व आपल्या अनुयायांना बावीस प्रतिज्ञांद्वारे संदेश दिला.

🌀महापरिर्निवाण
डॉ.आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी आणि आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी आणि सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चात्तापाने अवनतमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्‌धारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

   🙏बाबासाहेब आम्बेडकर🙏   

 ⭐जीवनेतिहास (थोडक्यात)⭐

🔷 १४ एप्रिल इ.स.१८९१
🔶महू गावी जन्म.
🔷 इ.स.१८९६
🔶आई, भिमाईचे निधन
🔷 नोव्हेंबर इ.स.१९०० 🔶सातार्‍याच्या शासकीय शाळेत प्रवेश.
🔷 इ.स.१९०४
🔶एलफिन्स्टन शाळेत प्रवेश.
🔷 इ.स. १९०६
🔶रमाई यांचेशी विवाह
🔷 इ.स.१९०७
🔶मॅट्रिक परीक्षा, ७५० पॆकी ३८२ गुणांनी पास केली.
🔷 इ.स.१९०८ जानेवारी 🔶एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश.
🔷 इ.स.१९१२
🔶मुलगा यशवंत भीमराव आंबेडकर यांचा जन्म झाला.
🔷 इ.स. १९१३
🔶बी.ए.ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पास झाले. ( पर्शियन आणि इंग्रजी हे विषय)
🔷  जून इ.स.१९१५
🔶एम.ए.ची परीक्षा पास झाले.
🔷  जून इ.स.१९१६
🔶कोलंबिया विद्यापीठातून पीएच.डी.साठी काम पूर्ण करून लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना झाले.
🔷 इ.स.१९१७
🔶कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली.
🔷 जून इ.स.१९१७
🔶लंडनहून एम.एस्‌सी. (अर्थशास्त्र)या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परतले, कारण बडोदा संस्थानाने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती.
🔷 इ.स.१९१८
🔶साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष
🔷 नोव्हेंबर इ.स.१९१८
🔶सिडनहँम महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रुजू, (विषय- राजकीय अर्थशास्ञ).
🔷 जून ३१ इ.स.१९२०
🔶साप्ताहिक मूकनायक सुरू केले
🔷 मार्च २१ इ.स.१९२०
🔶कोल्हापूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षपदी असलेल्या अस्पृश्य परिषदेत भाषण
🔷 जून इ.स.१९२१
🔶लंडन विद्यापीठाने त्यांना एम.एस्‌सी. (अर्थशास्त्र)ही पदवी प्रदान केली.
🔷 मार्च इ.स.१९२३
🔶रुपयाची समस्या हा प्रबंध व डी.एस्‌‍सी.(अर्थशास्त्र) ही पदवी
🔷२० जुलै इ.स.१९२४
🔶बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली, घोषवाक्य – शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
🔷 २० मार्च इ.स.१९२७
🔶चवदार तळे सत्यागृह
🔷एप्रिल ३ इ.स.१९२७
🔶बहिष्कृत भारत नावाचे वृतपत्र सुरू केले. संपादकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्वीकारली
🔷सप्टेबर इ.स.१९२७
🔶समाज समता संघ स्थापन केला.
🔷 इ.स.१९३४
🔶परळ येथून दादरला राजगृह येथे राहण्यास गेले, कारण पुस्तकांसाठी जागा अपुरी पडत होती.
🔷 मे २६ इ.स.१९३५
🔶रमाई भीमराव आंबेडकर यांचे निधन
🔷 ऑक्टोबर १३ इ.स.१९३५ 🔶येवला, येथे धर्मांतराची घोषणा
🔷 ऑगस्ट इ.स.१९३६
🔶स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना
🔷 डिसेंबर इ.स.१९४०
🔶थॉट्स ओन पाकिस्तान हे पुस्तक प्रसिद्ध
🔷जुलै इ.स.१९५१
🔶भारतीय बुद्ध जनसंघ या संस्थेची स्थापना
🔷मे इ.स.१९५३
🔶मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना
🔷डिसेंबर २५ इ.स.१९५५ 🔶देहूरोड पुणे येथे बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना
🔷डिसेंबर 6 , इ.स.1956
🔶महापरिनिर्वाण